Guru । Guide । Philosopher । Raju Parulekar - आयतं देणारी शक्ती या जगात नाही
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 22 ก.พ. 2022
- 'मनातलं'च्या या भागामध्ये ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक राजू परुळेकर यांनी भीती, प्रश्न यातून निर्माण होणाऱ्या एका समस्येबाबत विवेचन केलं आहे. कोट्यवधींचे आश्रम उभे करणारे समाजाला आणि माणसाला दुर्बल बनवतात आणि जबाबदारी झटकून टाकण्यासाठी निर्माण झालेली संस्था -व्यक्ती समाजाचं कधीही भलं करू शकत नाही असं परुळेकर यांनी म्हटलं आहे. सशक्त समाज-सशक्त राष्ट्र निर्माण व्हावं या उद्देशाने परुळेकर यांनी या विषयावर अत्यंत तळमळीने आपले मत मांडले आहे.
राजू परुळेकर यांचे मनातलं हे व्हिडीओ सदर अत्यंत लोकप्रिय होऊ लागले असून. The Insider च्या सगळ्या व्हिडीओंना प्रचंड प्रतिसाद मिळू लागला आहे. पारंपरीक माध्यमे आणि सोशल मीडियातून होत असलेल्या बातम्यांच्या आणि मजकुराच्या उष्ण भडीमारात राजू परुळेकर यांचे विचारी, विवेकी व्हिडीओ हे सावलीत मिळणाऱ्या थंडाव्याप्रमाणे आहेत. हे व्हिडीओ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचावेत यासाठी आपण हातभार लावावा ही आपल्याला विनंती. व्हिडीओ आवडल्यास तो लाईक करा, आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवा आणि इतरांनाही व्हिडीओ पाहता यावा यासाठी तो शेअर करा ही आपल्याला नम्र विनंती. आपण आम्हाला आपली प्रतिक्रिया insiderthe4@gmail.com या ईमेल आयडीवरही कळवू शकता.
एक माणूस काहितरी चांगल सांगतो ते स्वीकारले पाहिजे. परुळेकर सरांनी जेवढी पुस्तके वाचली आहेत आणि लिहिली आहेत तेवढी आपण पाहिली सुद्धा नसतील. इथेच आपण मार खातो. चांगल घेण्या पेक्षा त्यातून वाईट शोधतो. आणी आपल्याला अक्कल नसताना दुसर्याच्या चुका काढतो. हेच अशिक्षित माणसाचं लक्षण आहे.
चूक
त्यांच्या हाताला धागे बांधले आहेत ते कशाचे आहे
🙏
@@gopaltayade1131 अगदी बरोबर. ह्याचा खुलासा परुळेकर यांनी केला पाहिजे. त्यांचे विचार विचार करण्यासारखे आहेत हे खरे असले तरी.
बरोबर. ह्याचा खुलासा परुळेकर यांनी केला पाहिजे. त्यांचे विचार विचार करण्यासारखे आहेत हे खरे असले तरी.
नरेंद्र दाभोलकर व आपल्या सारख्या विवेकवादी आणि वैज्ञानिक दृष्टीने पाहणारी माणसं आहेत त्यामुळे आम्हालाही आपला आधार वाटतो.आपल्यामुळे काही माणसं विवेकवादी व वैज्ञानिक दृष्टिकोन असलेल्या व्यक्ती तयार होतील.अशी आशा आहे. आपण संयमपूर्ण शैलीत परखडपणे मते मांडतात हे मला आवडले.धन्यवाद.
अ. ह. साळुंखे ,प्रबोधनकार , महात्मा फुले यांची पुस्तके तुम्ही वाचलीत आणी ते विचार तुमच्या बोलण्यात वागण्यात आणि व्यक्तिम्त्वात दिसून येत आहे ,म्हणून तर बोलतात "वाचलं तर वाचाल"
सर तुमच्या मनात आहे तेच माझ्या मनात आहे.पण मी हे बोललो असतो तर माझ्यावर कारवाई झाली असती.सर तुमच्या सारख्या माणसांची आज समाजाला गरज आहे.
वा खूप छान परखडपणे व्यक्त झालात आज ज्ञानात मोलाची भर पडली
संत तुकाराम महाराजांचा गुरू शिष्य
संबंधितांने असलेले अभंग किती सहज आणि सुंदर रीतीने निरूपण केली!!
*गुरुशिष्य पण अधम ते लक्षण!
भीती नारायण खरा!
आप तैसाची दूसरा!! २!!
न कळता साप दोरी!
राहू नेदाव तो कांप!! ३!!
तुका म्हणे गुण दोषी!
ऐसे न पडावे सोसी!! ४!!
हे निरूपण जर किर्तनकार कीर्तनकारांनी सांगितले असते तर
उत्तर प्रदेशातील कॉर्पोरेट बुवा बाबांचे
महाराष्ट्रात *फावले* नसते.
धन्यवाद सर!
Dear Rajuji, You have been so upright about Brahmanvad. I salute to you. Bravo !!. Almighty gives you Lots of strength !!
सर,आपले विचार हे खरोखर अनमोल आहे.हे फक्त बुद्धी जीवी लोकांना पटेल.बाकी चोर,भामट्यानास्वार्थी लोकांना पटणार नाही.
Well said Raju parulekar.
इतक व्यवस्थित अचुक विचारी व्यक्तीच बोलु शकते.
अगदी खूप खूप खूप खूप खूपच बरोबर, aplyasarakhe खूपच कमी लोक आहेत व अशा विचारांच्या लोकांची सध्या आपल्याला खूपच गरज आहे.🙏🏻🙏🏻🙏🏻
उत्तम, मनाला बधिरता येते, अगदी सत्य.
सर आपण खुप चांगल्या रितीने प्रबोधन केले आहे . बुवा बाबा यांच्या नादी लागणाऱ्या लोकांसाठी खुप महत्वाचे आहे.
जोपर्यंत देव सोडणार नाही तोपर्यत बाबा बुआ देवी सुटणार नाही
आयु. परुळेकर सरजी, आपला अभ्यास खूप चांगला आहे. आपण खूप चांगल्या पद्धतीने समजावून सांगता. आपले हार्दिक आभार व अभिनंदन. तथागत शांतिदूत बुद्ध, क्रांतिबा फुले, संत तुकोबा, संत गाडगेबाबा, संत तुकडोजी, संत कबीरदास हे सर्व संत -महात्मा आपले आदर्श व प्रेरणा आहेत. यांनी सांगितलेल्या मार्गांवर चालले तर माणसांचे निश्चितच कल्याण होईल.
तुम्ही खूप छान विश्लेषण करता..तुम्हाला ऐकतच रहावे असे वाटते..
उत्तम मांडणी , सुंदर विवेचन ...!
नमस्कार
फार छान, हे कळून वळल तर समाजात मोठं परिवर्तन होईल.
सदगुरू साक्षात परब्रम्ह...या वाक्याचा गर्भित अर्थ जेव्हां जेव्हां घेतला आणि अनुभव ला तेव्हां मला जाणीव झाली,की आपल्याला ज्ञान धीर, मार्ग दाखविणारा आपल्या आतच आहे. तूम्हचे विचार मला पटतात आणि विचार करायला लावतात.
उत्कृष्ट नमुना आहे. छान माहिती दिली आहे....
मैं आस्तिक था और अब नास्तिक हूँ इस बात कि मुझे खुशी हैं ।
तुम्हाला मी खुप दिवसा पासुन यैकतोय आनी आता तुम्हीं मला आजच्या काळाचे चार्वाक पंडीत वाटता, सरांचा विचार हा सर्व बहुजन पर्यंत पोहचावा हिच अपेक्षा
Science journey channel बघा
सर, खूपच उद्बोधक मार्गदर्शन आहे. मी शंभर काय हजार टक्के सहमत आहे. फक्त आपण आपल्या उजव्या मनगटावर काळा आणि लाल दोरा बांधला आहे, तो का?
गौतम बुद्ध यांचं जीवन चरित्र वाचलं की मानवी जीवन हे किती सहजपणे जगता येत ते कळत. पण त्यासाठी स्व गवसन व आत्मभान येणं या साठी प्रथम काय काय करावं लागतं हे कळत.
खरं तर प्रत्येकाने स्वतःचे म्हणजेच व्यक्तीगत प्रश्न स्वप्रयत्नाने म्हणजे कृतीशील राहून सोडवण्याचा विचार केला पाहिजे. बाबा-बुवा ह्या प्रकारात भोंदूपणा ९९.९९% असतो ह्यात शंका नाही. जिथे आर्थिक वा अन्य प्रकारे शोषण होण्याचा अवलंब केला जातो तिथे कोणीही अजिबात फिरकू नये! नर्मदे हर!
या साठीच दाभोळकर लढत होते.आजही भोंदूगिरी ची बांडगुळे इतकी माजलेली आहेत की समाज सुटेल असे वाटत नाही.
आपले बरोबर आहे.
पण ह्यांनी सुद्धा अंगठी व गंडा दोरा बाबा कडून बांधला आहे. त्याचे काय.
खूप सुंदर ! मुलांना सोबत घेऊन सरांचे विचार ऐकले. खरंतर हे प्रत्येकाने करायला हवं. त्याशिवाय चांगला समाज घडणार नाही.
दारू, गुटका , जाती पातीच्या, धर्मा धर्माच्या दंगली, अंधश्रधा, बुवा बाजी यातून राजकारण्यांची वोट बँक तसेच धन कमाई होते. केवळ आणि केवळ त्याचमुळे समाजात, देशात हे प्रकार कदापि कमी होतांना दिसत नाहीत. समाज सतत यात गुरफटतो मग कसले शिक्षण आणि कसले विचार, संस्कार.
स्वयंप्रकाशित व्हा ! - गौतम बुद्ध
मानवी मूल्य सांगणारे आणि जोपासणारे। भगवान बुद्ध हे सर्वच प्रकारच्या लोकांसाठी मूल्य सांगतात,
समाज प्रबोधन गरजेचे आहे.....thank you!
कसले प्रबोधन?? धर्म देव न मानणाऱ्या लोकांकडून कसले प्रबोधन घ्यायचे??
१००% प्रबोधन झाले पाहिजे.. कारण श्रध्दा ही अंध श्रद्धा असता कामा नये आणि धर्मात धर्मांधता नको. देव आणि धर्म जर समाज सुधारण्यासाठी असतील तर उत्तम. कालचा राम आणि कालचा धर्म समाज सुधारायचा अर्थात रामाचे बंधू प्रेम, पत्नी प्रेम, आज्ञाधारक पणा आणि धर्म तर सतत सत्य आणि अहिंसेची शिकवण देत आलाय पण आजचा राम आणि धर्म फक्त हिंसा शिकवतोय याच साठी पुर्वीच्या जाणकारांनी सांगितलेय की देव आणि धर्म उंबरठ्यापर्यंतच असावा.
१) जे.कृष्णमूर्ती म्हणतात" मी कुणाचा गुरू नाही,माझा कुणी गुरू नाही"
कृष्णमूर्ती चे विचार मेंदूला मुंग्या आणतात.
कुठलीही समस्येचे मूळ,हे,आपण सोडून इतरांना जबाबदार धरतो हे होय.
जेंव्हा मी त्या समस्येचा भाग आहे ,हे शहाणपण येईल ,तेव्हा जगण्याचे कोडे उलगडेल.(कदाचित हा पण भास असू शकेल)
Sir , superb विश्लेषण
बरोबर आहे.
अप्रतिम परूळेकर साहेब .
कोकणात आमच्या हे प्रकार खुपचं वाढलेत .यावर आम्ही सतत बोलुन समजावतो पण आज हे ऐकल्यावर आणखी एक वेगळी दिशा आणि विचार सापडलेत
त्या नाणीजच्या नरेंद्र महाराजांचे शिष्य कर्नाटकात,आंध्रप्रदेशात पण तयार झालेत. अमेरिकेत पण आहेत.
Tathagat gautam buddhaanche vichar suddha hech hote mhanun te aastik nhavte nastik nhavte parantu vastavik hote
Namo Buddhay 🙏💙
Excellent 👍
आताचे गुरू कसले हा पैशा गोळा करण्याचा धंदा, ज्ञानेश्वर यांनी फुकट ज्ञानेश्वरी सांगितले ,आणि हे ,हभप लाखो रुपयांची कमी करतात, अतिथी भव सांगणार हभप चे घरी गिरगावातल्या घरी मे महिन्यात भर दुपारी गेलो साध पाणी ही विचारले नाही आणि टीव्ही वर कीती गोड बोलतात.
आता पुन्हा जाऊ नका..त्यापेक्षा घरी बसून चार पुस्तके वाहली तर आपली विद्वत्ता वाढेल आणि आपले प्रश्न आपण सोडू शकतो.
@@sachindandge764 khar ahe
You are absolutely right Sir.Very well explained.Reality exposed.Go ahed
अत्यंत विवेकशील ,चिन्तनशील विचार .धन्यवाद.
समाजातील महिला वर्गात श्रध्दा/अंधश्रध्दाचा पगडा फार मोठा आहे. बाबा बुवांच्या भोंदुगीरीला हा महिलावर्ग फार लवकर बळी पडतो आणि या महिलांकडून ह्या श्रध्दा, अंधश्रध्दा त्यांच्या परीवारात, मुलांकडे जातात. म्हणुन ही नविन पिढी अधिक श्रध्दाळु/अंधश्रध्दाळु दिसुन येते..!
अंधभक्तांचा भारत
सही वर्णन केलाय तुम्ही ह्या सर्व बाबागिरी लोकांचे ✌️ राजू सर
छानच - स्वकर्तृत्वाने ज्या गोष्टी मिळवता येत नाहीत, त्यासाठी बुवा, बाबा, सद्गुरू, परमेश्वर ह्यांच्याकडे प्रार्थना , पूजा-अर्चा, भक्ती वगैरे करून त्या प्राप्त होतील अश्यावर विश्वास ठेवला जातो आणि परुळेकर सर म्हणाले तसं मनुष्य म्हणून आपलं ' नैतिक अध:पतन होतं - श्री. नरहर कुरुंदकरांनी ह्या विषयावर बरंच साहित्य लिहिलंय
परुळेकर सर - निदान ह्या विषयासाठी तरी मानावे तितके तुमचे आभार कमी पडतील
प्रणाम 🙏
फार सुंदर सर , डोळ्यात अंजन घालणारं आणि भरकटणाऱ्या लोकांच्या डोक्यात प्रकाश पडणार असं आपलं प्रबोधनात्मक म्हणण आपण मांडलत, आपलं हे प्रबोधन ईतर लोकांपर्यंत विशेष करून तरुणवर्गा पर्यंत पोहोचवण खूप महत्वाचं ठरू शकतं आणि माझ्या परीने मी ते काम नक्की करणार आणि इतरांनीसुद्धा करावं ही विनंती, धन्यवाद सर 🙏
अभिनंदन, परुळेकर सर.🙏
तथागत बुद्ध यांची वाणी सांगितले सर।। thanks..❤
Very sensible thoughts !
1 No. माणूस आहेत..... राजू परुळेकर sir.... 👌👌👌ऑल words are true....!!!!👌👌👌
खूप छान माहिती दिल्या बदल खूप खूप धन्यवाद साहेब
🙏🙏🙏
तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार.......
In India, 2500 BC, Buddha, discovered Dhamma, Dhamma, keep you away from all these bua and Baba....Thanks to Dr. Ambedkar as a pragmatist who kept away large group of people from all blind faith and mental hegemony.👍💐🙏🏼
परुळेकर साहेब खरच ग्रेट आहात.
निरंत प्रबोधन करणे गरजेचे आहे,वा, छान
या देशात खर बोळणार्या. पेक्षा बरेबोळणारी माणसं चालतात साहेब
बुडते हे जण न देखवे डोळा👌👌👌
मानवाचं कल्याण करणारे युगपुरुष फक्त तथागत भगवान गौतम बुद्ध आहेत. 🙏
परुळेकर साहेब 👌👍
ह्या जगात ' फक्त ' कुणीही नाही! हा मुस्लिम/ख्रिश्चन विचार आहे. बुध्द पंथाचे शिरकाण इस्लामिक आक्रांतानी केले हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना चांगले अवगत होते. त्यांनी काळानुसार modify करून धम्म स्वीकारला. त्यामुळे ते धर्म प्रवर्तक ठरतात. यावर विचार व्हावा ही विनंती.
म्हणजे नेमक काय केल बुद्धानी.
जबरदस्त विचार
आपले वरील विषयावरील विचार, त्यातला परखडपणा , आपल्या अनुभवांचे बोल, अतिशय सुंदर,. मार्मिक, विचार करायला लावणारे आहेत. तसेच तुम्हीच तुमचे गुरू हे वाक्य आणि या विषयाचा शेवटही आवडला. धन्यवाद.
असे विचार म्हणजे डोक्याचे वाटोळे झाले आहे !
खरोखर अतिउत्तम Paradox समजावून सांगितला आहे आणि विचारप्रवृत्त करायला लावणारे विचार आहेत, मनापासून धन्यवाद🙏🌹👌👍
Khup chan explanation bhau , keep it up.
Super .
Mi hi nisargdatta Maharaj yanche I am that (sukhsauwad -marathi) vachale aahe.
Thanks again parulekar sir🙏🙏
सुरेख विवेचन. मानवी मनाचा वेग फार मोठा आहे. म.फुले यांनी बुवाबाजी यापासून दूर रहा असे सांगितले आहे. आपल्या देशात बहुतांशी लोकांनी विचार शक्ती गमावली आहे.
Khup Chan analysis and hundred percent true .
तुम्ही म्हणता असं नैतीक अध्धपतन कोणत्या ही शिष्याचे सद्गुरु अथवा गुरू करीत नाही !!!
Well explained, Right subject
समाधानकारक मांडणी केलेली आहे सर जय गाडगे बाबा, जय तुकाराम महाराज,
छान मांडणी.
एक प्रश्न : तुमच्या बोटातील अंगठी कसली आहे आणि मनगटावर दोरा कोणी बांधला आहे?
सोनं घालून शृंगार करणं चुकीचं आहे का
वस्तुस्थिती सांगतात आणि समाजाला चांगली दिशा देत आहेत..
खुप व्यवस्थितपणे समाजात सर्वीकडे पसरलेल्या गोड व्यसनाबद्दल समजावून सांगीतल आपण. आज आपल्या देशात या गुरूंचे, ढोंगी बाबांचे / संताचे प्रत्येक स्तरात - समाजात - धर्मात हि प्रवृत्ती फोफावत चाललीय त्यामुळे समाजाचे व देशाचे खुप मोठी हानी होत आहे.
👍🏼
राजुच्या मते सर्वच बाबा ढोंगी आहेत, कारण ज्ञानाची एक शाखा जिला अध्यात्म म्हणतात तिला हा माणूस मान्य करत नाही. या माणसाला symptomatic आणि psychosomatic यातला फरकच समजत नाही.... प्रवचने हा मनावर असलेल्या परिस्थितीची, अनास्थेची जळमटे काढण्यासाठी केलेला उपक्रम आहे, त्यावर जर पैसा कोणी कमवत असेल तर तो भाग वेगळा आहे.
खूपच छान प्रबोधन करता आपण मानवी धन्यवाद
मनस्वी धन्यवाद
Very nice sir.
It is easier to fall for anything than to stand for something.
मी आपले बऱ्याच विषयावरील विचार ऐकले आहेत । स्पष्ट आपले विचार मांडता । या विषया संदर्भात-
आपण पाहतो दररोज हजारो लाखो ठिकाणी भजन, कीर्तन, प्रवचन असे कार्यक्रम होतात । एक व्यक्ती जीवनभर कमीतकमी शंभर वेळा तरी भजन, कीर्तन किंवा प्रवचन ऐकलं असतो। जवळपास बहुतेक वेळा यातून तोच तो उपदेश संदेश असतो। असे कार्येक्रम ऐकण्यासाठी बहुतेक 40 वर्ष वरील व्यक्ती दिसतात । मला असं दिसत की इतकं ऐकून सुद्धा त्यांच्या आचरणात काहीच सुधार होत नाही।
Mano pugamma dhamma , mano setha mano Maya ...... मन हेच प्रधान आहे, आणि सर्व विकार तृष्णा हे मनाशी बाळगून आस्ते
read and listen osho......he is master of all master's.....
So true ! What you say is the really spirituality not what people do to put their vivek at the mercy of some bua/ sadhu who is dangerous !
Religion is not spirituality ! We should be curious about our existence and progress as human towards awareness ! 🙏
सर तुमचे वाचन आणि आकलन करण्याची जी कला आहे विचार मांडणी खूप छान आणि सुंदर आहे तुम्ही खूप छान बोलता
स्वतः आचरण करावे? धागे बांधू नये?
Thanks good guidance dhanyad
अत दीप भव हेच खरं आहे.
अप्रतिम ❤
You are great sir ❤
अप्रतिम 💐💐
अगदी सत्य आपण सांगितले आहे. पण लक्षात कोण घेतो.
ग्रेट
ग्रेट
ग्रेट
Very well explained ... we need thinkers like Mr Parulekar 🙏🏻👌🏻
सर तुमच्यामुळे बरेच गुंतागुंतीचे विचार परखडपणे समजायला मदत होते. तुमचे विचार आमच्या सारख्या नव अभ्यासकांना प्रेरणादायी आहेत.
व्वा! छान विश्लेषण. शंकांचे निरसन होण्यासाठी मदत झाली.
आपले विचार मला खूपच अवडलेत, मी नक्कीच हे विचार जीवनात उतरवेंन
आपणच आपले गुरू आपलाच वाद आपल्याशी हे या संवादाचे सार आहे
खुप छान विश्लेषण, मांडणी सुंदर.दाभोलकर हेच सांगतात न!
फार सुंदर मार्गदर्शन सर 👍
छान !!👍
He ase vastavvadi ani spast vichar khup prasar hone avashak ahe.
भगवान बुद्ध यांनी सांगितलेले अष्टविनया पैकि प्रथम विनय म्हणजे सम्यक दृष्टी हे एक विनय जरी चांगल्याप्रकारे समजून घेतले आणि जिवन जगतांना वापरले तरी सर्व जिवन वास्तविक पणे जगता येते. चांगल्या आणि वाईट/ सुख आणि दुख या नाण्याच्या दोन्ही बाजुचा स्विकार करूनच जिवन जगाव लागते . यातुन कोणाचीही सुटका नाही. निसर्गात जे चांगले आणि वाईट आहे ते तसेच माणसांच्या जावनात उतरले आहे हे ईथे समजुन घेतले पाहिजे. म्हणजे निसर्ग नियमानुसार जिवन जगले पाहिजे. nagural law never changing but ever remaining.
अष्ट विनयाचेच इकडे अष्ट विनायक झाले काय बावा 😮. प्रदीप आगलावे साहेब काल परवा सांगतच होतें की पंढरपूरचे विठ्ठल मंदीर मूळचे बौद्ध ठिकाण आहे म्हणून.
खूपच वास्तववादी विचारसरणी 👍🙏
अगदी योग्य मार्गदर्शन केलत सर
.अप्रतिम वर्णन.
Very well done... thank you..
Sundar,ati sundar
Apratim Leacture dillay Apan Parulekar. JI hats off Samajat 90% lok he Kamkuvat manchi astat tyana readymade Answars havi astat , ani ti tyana miltatahi asha Buea/Bhaba/Bhagat hya categaichya lokana bhetun.
अतिशय छान विश्लेषण ❤ ❤ ❤
Sir, very much informative knowledge you have given in this video ! Everybody should watch this video for improving living skill.
🙏🙏🙏
Hon parulekar sir excellent explanation of buva baba you have given lessons that are practicable initially I viewed on discussion on political agenda your discussion was awesome on RSS and their principles and working formulas you suggested a nice book I am that is it available thanx pls continue on this cu
खूप छान माहिती दिली आहे
अतिशय महत्वाचं.. प्रबोधक.. 👍❤️