*आजचा विषय* 🥭🥭🥭🥭🥭🥭🥭🥭🥭 *जुन्या झाडांचे पुनर्जीवन* *कसे करावे?* *व त्यापासुन मिळणारे* *उत्पादन कसे वाढवावे :* 🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳 *प्रस्तावना :* आंबा रोप लागवडी नंतर पहीली २० ते २५ वर्षे झाडाची फलधारणा चांगली असते व वाढत्या वयाबरोबर ३५ वर्षांपर्यंत ती आणखी वाढत जाते त्यानंतर पुढील काही वर्षे ; पठारावस्था कालावधीत ही फलधारणा स्थिर रहाते मात्र कालांतराने अशा वय वाढत असलेल्या झाडाची फळधारणा कमी होत जाते.फळ कमी येणे वा फळ अजिबात नयेणे; या व अशा अनेक समस्या जुन्या झाडांच्या बाबतीत अनुभवयास येतात. *गावठी भाषेत याला झाड वठणे* असे ही म्हंटले जाते . काही झाडांच्या बाबतीत झाडांची उंची खूपच वाढल्यामुळे ; फळे आलीच तर ती खूप उंचीवर असल्याने ती काढताही येत नाहीत.आलेली फळे काढता नआल्यामुळे पिकून पडल्यामुळे खराब होवुन जातात किंवा पशूपक्षी यांच्याकडुन खावुन खराब केली जातात . 🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹 म्हणून झाडाची छाटणी करुन अशा वठत चाललेल्या झाडांचे पुनर्जीवन करुन अशा झाडांकडून पुनरुत्पादन देखील घेता येते. 🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸 *आंबा झाडाचे* *पुनर्जीवन व पुनरुत्पादनासाठी* *काय करावे ?* 🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔 *उपाय :* १)१२ ते १५ फुट उंचीवर झाडाच्या वर जाणाऱ्या मुख्य खोडास करवताच्या किंवा इतर यंत्रांच्या सहाय्याने सपाट कट मारावा ; (त्यामुळे झाडाची वर होत जाणारी अनियंत्रित वाढ पूर्णपणे बंद होइल.) २) उंच गेलेले मुख्य खोड छाटल्यानंतर शिल्लक असणाऱ्या चारही दिशाना जाणाऱ्या सर्व उपफांद्या मुख्य खोडापासून ३ ते ५ फुट अंतराने कट कराव्यात. मात्र या फांद्या कापण्यापुर्वी ; कट मारण्याच्या जागेच्या अलिकडे काही उपफांद्या जाणीवपूर्वक शिल्लक ठेवाव्यात.जणे करुन नवीन फुटवा येउन झाड पुन्हा पाना फुलानी बहरुन जाइल. ३) झाडावर बांडगूळ व अमरवेली यासारख्या काही परजीवी वनस्पती असल्यास काढून टाकाव्यात .या परजीवी वनस्पती - झाडाच्या खोडातुन जीवनरस(अन्नरस) शोषून झाड कमकुवत बनवत असतात . ४) झाडाची छाटणी झाल्यावर ; झाडाच्या मुख्य खोडाच्या सर्व बाजूने खोडापासून ६ फुट अंतराने ३ फुट उंचीची गोलाकार दगडाची/जांभ्याची/वीटांची ताल घालून घ्या . ५) झाडाच्या खोडास किड , वाळवी , भिरुड आळी व मुंग्या यांचा अपाय झाला असेल तर मुख्य खोड खराब होण्याची शक्यता असते.अशा वेळी खोडातील किड बाहेर काढून टाकावी यासारखी किड समुळ संपवण्यासाठी गोमुत्र किंवा स्प्रे बोर्डोपेस्ट चा वापर करावा . तनंतर जमिनीपासून किमान आठ फुटापर्यंत मुख्य खोड व फांद्या यांच्या पृष्ठभागावर बोर्डो पेस्ट चे तयार केलेले द्रावण रंगवून घ्यावे. ६) गोलाकार तालीच्या आतील बाजूस तळाशी थायमेट टाकुन अर्धा फुट पालापाचोळा किंवा वाळलेले काष्ट पसरावे . त्यानंतर उरलेला गोलाकार भाग सुपीक माती व नैसर्गिक खते (शेणखत ,लेंडीखत,कंपोस्ट,लिंबोळी पेंड व गांडूळखत) यांचे मिश्रण गोलाकार तालीच्या आतून भरून घ्यावी . तत्पूर्वी आतील बाजूस फंगिसाइड -थायमेट- बीएससी पावडर तालीच्या आत पसरावी किंवा बुरशीनाशकाची फवारणी करुन घ्यावी. ७) वरील प्रमाणे खत व्यवस्थापन केल्यानंतर लगेचच या तालीत टाकलेले खत व माती चांगली भिजेल अशा पध्दतीने पाणी दयावे. किमान एक महिना नियमित पाणी द्यावे. ८) झाडाच्या सपाट कापलेल्या जागी बोर्डोपेस्ट लावावी. ९) जमीनीत नत्र ,स्फुरद व पालाश त्यांचबरोबर सूक्ष्मअन्नद्रव्ये यांची कमतरता असेल तर अशी खते भरीने पावसाळ्यापूर्वी व पावसाळ्यानंतर गोलाकार चर काढून द्यावीत. ८) प्रतीझाड द्या *वय २५ ते ३५ वर्ष* *शेणखत : २० /२५ घमेली* नत्र (युरिया): १० किलो . (दोन टप्प्यात ५+५ किलो) जुन व औगस्ट * सिंगल सुपर : ५ किलो Gr. औगस्ट * मुरेट ओफ पोटॅश : ४ किलो Gr. औगस्ट व २० दिवसानंतर मायक्रो न्युट्रीयंट सोबत सूक्ष्मअन्नद्रव्ये २ किलो द्यावे . (वरील सर्व मात्रा सेंद्रिय (नैसर्गिक) पध्दतीने दिली तरीही चालेल. *रासायनिक खतांचा हट्ट नाही.* ९) सर्वात महत्वाचे : कृषी सल्ल्यानुसार आवश्यकतेनुसार बुरशीनाशक व कीटकनाशक यांच्या फवाऱण्या कराव्यात . १० ) गायीचे शेण व गोमुत्रापासुन जीवामृत तयार करुन झाडास दर १५ दिवसानंतर नियमितपणे दिल्यास रासायनिक खतावरील खर्च कमी होतो व झाडाला अधिक प्रमाणात अन्नद्रव्यांचा पुरवठा होतो . ११) एका वर्षांनंतर झाडावरील फळे काढल्यानंतर लगेचच झाडाची वाढ व विस्तार पाहून छाटणी करावी . १२ ) झाड कापण्यासाठी कुऱ्हाड कोयता किंवा पारळी नवापरता करवत किंवा पेट्रोल किंवा लाइट वर चालणारी अवजारे वापरावीत व ती सर्व निर्जंतुक केलेली असावीत.
खूप छान माहिती सरजी. अशीच माहिती देत रहा.. धन्यवाद.
धन्यवाद दादा
राहुल भाउ,
तुमच्याकडे ही पेपर बॅग मिळेल का? असल्यास प्रती बॅग काय rate आहे.
माझा whatsapp no .
8888782253
6:21 Bag kuthe milel patta dhyava
हा माझा whatsapp no.
8888782253
Sir chote zhad asel tar chalel pan mothya zhadansathi kase use karnar
call me ..
88 55 900 300 / 8888782253
*आजचा विषय*
🥭🥭🥭🥭🥭🥭🥭🥭🥭
*जुन्या झाडांचे पुनर्जीवन*
*कसे करावे?*
*व त्यापासुन मिळणारे*
*उत्पादन कसे वाढवावे :*
🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
*प्रस्तावना :*
आंबा रोप लागवडी नंतर पहीली २० ते २५ वर्षे झाडाची फलधारणा चांगली असते व वाढत्या वयाबरोबर ३५ वर्षांपर्यंत ती आणखी वाढत जाते त्यानंतर पुढील काही वर्षे ; पठारावस्था कालावधीत ही फलधारणा स्थिर रहाते मात्र कालांतराने अशा वय वाढत असलेल्या झाडाची फळधारणा कमी होत जाते.फळ कमी येणे वा फळ अजिबात नयेणे; या व अशा अनेक समस्या जुन्या झाडांच्या बाबतीत अनुभवयास येतात.
*गावठी भाषेत याला झाड वठणे* असे ही म्हंटले जाते .
काही झाडांच्या बाबतीत झाडांची उंची खूपच वाढल्यामुळे ; फळे आलीच तर ती खूप उंचीवर असल्याने ती काढताही येत नाहीत.आलेली फळे काढता नआल्यामुळे पिकून पडल्यामुळे खराब होवुन जातात किंवा पशूपक्षी यांच्याकडुन खावुन खराब केली जातात .
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
म्हणून झाडाची छाटणी करुन अशा वठत चाललेल्या झाडांचे पुनर्जीवन करुन अशा झाडांकडून पुनरुत्पादन देखील घेता येते.
🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸
*आंबा झाडाचे*
*पुनर्जीवन व पुनरुत्पादनासाठी*
*काय करावे ?*
🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔
*उपाय :*
१)१२ ते १५ फुट उंचीवर झाडाच्या वर जाणाऱ्या मुख्य खोडास करवताच्या किंवा इतर यंत्रांच्या सहाय्याने सपाट कट मारावा ;
(त्यामुळे झाडाची वर होत जाणारी
अनियंत्रित वाढ पूर्णपणे बंद होइल.)
२) उंच गेलेले मुख्य खोड छाटल्यानंतर शिल्लक असणाऱ्या चारही दिशाना जाणाऱ्या सर्व उपफांद्या मुख्य खोडापासून ३ ते ५ फुट अंतराने कट कराव्यात. मात्र या
फांद्या कापण्यापुर्वी ; कट मारण्याच्या जागेच्या अलिकडे काही उपफांद्या जाणीवपूर्वक शिल्लक ठेवाव्यात.जणे करुन नवीन फुटवा येउन झाड पुन्हा पाना फुलानी बहरुन जाइल.
३) झाडावर बांडगूळ व अमरवेली यासारख्या काही परजीवी वनस्पती असल्यास काढून टाकाव्यात .या परजीवी वनस्पती - झाडाच्या खोडातुन जीवनरस(अन्नरस) शोषून झाड कमकुवत बनवत असतात .
४) झाडाची छाटणी झाल्यावर ;
झाडाच्या मुख्य खोडाच्या सर्व बाजूने खोडापासून ६ फुट अंतराने ३ फुट उंचीची गोलाकार दगडाची/जांभ्याची/वीटांची ताल घालून घ्या .
५) झाडाच्या खोडास किड , वाळवी , भिरुड आळी व मुंग्या यांचा अपाय झाला असेल तर मुख्य खोड खराब होण्याची शक्यता असते.अशा वेळी खोडातील किड बाहेर काढून टाकावी यासारखी किड समुळ संपवण्यासाठी गोमुत्र किंवा स्प्रे बोर्डोपेस्ट चा वापर करावा . तनंतर जमिनीपासून किमान आठ फुटापर्यंत मुख्य खोड व फांद्या यांच्या पृष्ठभागावर बोर्डो पेस्ट चे तयार केलेले द्रावण रंगवून घ्यावे.
६) गोलाकार तालीच्या आतील बाजूस
तळाशी थायमेट टाकुन अर्धा फुट पालापाचोळा किंवा वाळलेले काष्ट पसरावे . त्यानंतर उरलेला गोलाकार भाग सुपीक माती व नैसर्गिक खते (शेणखत ,लेंडीखत,कंपोस्ट,लिंबोळी पेंड व गांडूळखत) यांचे मिश्रण गोलाकार तालीच्या आतून भरून घ्यावी . तत्पूर्वी आतील बाजूस फंगिसाइड -थायमेट- बीएससी पावडर तालीच्या आत पसरावी किंवा बुरशीनाशकाची फवारणी करुन घ्यावी.
७) वरील प्रमाणे खत व्यवस्थापन केल्यानंतर लगेचच या तालीत टाकलेले खत व माती चांगली भिजेल अशा पध्दतीने पाणी दयावे.
किमान एक महिना नियमित पाणी द्यावे.
८) झाडाच्या सपाट कापलेल्या जागी बोर्डोपेस्ट लावावी.
९) जमीनीत नत्र ,स्फुरद व पालाश त्यांचबरोबर सूक्ष्मअन्नद्रव्ये यांची कमतरता असेल तर अशी खते भरीने पावसाळ्यापूर्वी व पावसाळ्यानंतर गोलाकार चर काढून द्यावीत.
८) प्रतीझाड द्या
*वय २५ ते ३५ वर्ष*
*शेणखत : २० /२५ घमेली*
नत्र (युरिया): १० किलो .
(दोन टप्प्यात ५+५ किलो)
जुन व औगस्ट
* सिंगल सुपर : ५ किलो Gr.
औगस्ट
* मुरेट ओफ पोटॅश : ४ किलो Gr.
औगस्ट
व २० दिवसानंतर मायक्रो न्युट्रीयंट
सोबत सूक्ष्मअन्नद्रव्ये २ किलो द्यावे .
(वरील सर्व मात्रा सेंद्रिय (नैसर्गिक) पध्दतीने दिली तरीही चालेल.
*रासायनिक खतांचा हट्ट नाही.*
९) सर्वात महत्वाचे :
कृषी सल्ल्यानुसार आवश्यकतेनुसार बुरशीनाशक व कीटकनाशक यांच्या फवाऱण्या कराव्यात .
१० ) गायीचे शेण व गोमुत्रापासुन जीवामृत तयार करुन झाडास दर १५ दिवसानंतर नियमितपणे दिल्यास रासायनिक खतावरील खर्च कमी होतो व झाडाला अधिक प्रमाणात अन्नद्रव्यांचा पुरवठा होतो .
११) एका वर्षांनंतर झाडावरील फळे काढल्यानंतर लगेचच झाडाची वाढ व विस्तार पाहून छाटणी करावी .
१२ ) झाड कापण्यासाठी कुऱ्हाड कोयता किंवा पारळी नवापरता करवत किंवा पेट्रोल किंवा लाइट वर चालणारी अवजारे वापरावीत व ती सर्व निर्जंतुक केलेली असावीत.