Eknath Shinde : हिंदुत्वाचा प्रचार करणारी महायुती अचानक मतांसाठी मदरश्यांवर खैरात का करते आहे?
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 10 ต.ค. 2024
- #MarathiNews #LatestMarathiNews #maharashtrapolitics
#Eknathshinde #devedrafadnavis #ajitpawar
डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेत राज्यातील मदरसांमध्ये पारंपरिक, धार्मिक शिक्षणाबरोबरच गणित, विज्ञान, समाजशास्त्र, हिंदी, मराठी, इंग्रजी व उर्दूचे शिक्षण देण्यासाठी कंत्राटी पद्धतीने शिक्षकांची नेमणूक करण्यात येते. सध्या डी. एड. शिक्षकांना सहा हजार रुपये मानधन देण्यात येते, ते 16 हजार रुपये करण्यात येईल. तसेच माध्यमिकचे विषय शिकवणाऱ्या बी.ए. बी.एड., बी.एस्सी-बी.एड. शिक्षकांचे मानधन आठ हजार रुपयांवरून 18 हजार रुपये करण्यात येईल. असा निर्णय महायुती सरकारने घेतला.. त्यावरून राजकारणाला सुरूवात झालीय.. योगी सरकारने यूपीमध्ये रद्द केली तर महायुती मदरश्यांवर खैरात का करतेय? यावरच आहे आजचा मुद्दा.. सहभागी झालेत मुंबई Tak चे संपादक साहिल जोशी, ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र साठे आणि सकाळ वृत्तपत्राच्या सहयोगी संपादिका मृणालिनी नानिवडेकर
#RPT0155
🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्...
#maharashtra #marathi ##marathinews
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi TH-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
एकीकडे मदरशांना मदत केली जात आहे. तर दुसरीकडे मराठी शाळा बंद करण्यात येत आहे. काय म्हणावं याला?
बहुतेक महायुतीला निवडणूक निकालाचा अंदाज कळला असेल त्यामुळेच सत्ता सोडायची पण अर्थव्यवस्थेची सत्यानाश, राज्याच्या सत्यानाश करायचा त्यामुळे येणाऱ्या सरकारला त्रास होईल, म्हणूनच नवाचता १८०० फाईल वर सही केली मुख्यमंत्रींनी.