वास्तुशांती का करावी.?
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ต.ค. 2024
- वास्तू शांती विधान
©महाजन गुरुजी
वास्तुशांती का करावी? याचे विधान काय आहे ते पाहू
लग्न पहावं करुन, घर पहावं बांधून ही एक प्रचलित म्हण आहे. म्हणजेच या दोन्ही गोष्टींचे आपल्या जीवनात अनन्यसाधारण महत्व आहे. वास्तू हा शब्द वास धातूपासून निर्माण झाला. वास म्हणजे राहणे. राहण्यायोग्य वास्तू कशी असावी हे आपण वास्तुशास्त्र प्रकरणात पाहू.
वास्तू शब्दाचा अर्थ:-
©Mahajan guruji
मनुष्याला जीवनात तीन प्रमुख बाबींची आवश्यकता असते. जीवनात शक्तीसाठी अन्न, निसर्गाच्या तापमानानुसार वस्त्र आणि निवासासाठी सुरक्षित घर. वरील तीनपैकी घर ही महत्त्वाची गरज आहे. त्याचप्रमाणे आपल्याला लाभलेले घर हे लाभदायी ठरावे, याचाही विचार आपण केला पाहिजे.
आपण आपल्या आयुष्यामध्ये रात्रंदिवस अहोरात्र कष्ट करीत असतो. आपल्या सर्वसामान्य लोकांचे एकच स्वप्न असते. आणि ते म्हणजे आपल्या स्वतःचे एखादे घर असावे. अहोरात्र कष्ट करून तसेच कर्ज इत्यादि मिळूनही आपल्या घराचे स्वप्न साकार होतेच असे नाही. ते स्वप्न साकार होण्यासाठी दैवाची अनुकूलता मिळवावी लागते. ज्योतिष अभ्यासाप्रमाणे आपल्या कुंडलीतील चतुर्थ स्थानावरुन वास्तु लाभ पहातात.
दैव तसेच ग्रह अनुकूल झाल्यानंतरच आपले स्वतःच्या मालकीच्या घराचे स्वप्न प्रत्यक्षात साकार होते. त्यानंतर मात्र आपल्याला होणारा आनंद मात्र न भूतो न भविष्यति असाच असतो. कालांतराने मात्र हा आनंद हळूहळू कमी होत जातो आणि त्याची जागा मात्र कष्ट, दुःख, आजार हे घेतात. मग आपणास शंका येते की, आपल्या या जागेमध्ये काही दोष आहे का? या जागेमध्ये काही तांत्रिक देवतांचे वास्तव्य आहे का? आपल्याला कोणाची तरी दृष्ट लागली तर नाही ना? या सर्व गोष्टींचा अभ्यास केल्यानंतर एकच गोष्टीचा उलगडा होतो की, आपण आपल्या वास्तुची शांती केली नाही. ©Mahajan guruji
श्री महादेवने वास्तु पुरुषाला असा आशिर्वाद दिला जो कोणी नविन वास्तु निर्माण करेल त्या वास्तुची वास्तुशांती करणार नाही तो या वास्तुचा आहार बनेल व ती वास्तु स्मशानभूमी बनेल व वास्तुमुळे त्रास होईल असा आशिर्वाद प्राप्त झाला.
या सोबत जो मनुष्य नविन वास्तु निर्माण करतो तेव्हा त्या वास्तु भुमिच्या सप्त पाताळ नावे पुढील प्रमाणे 1:अतल, 2: वितल, 3: सुतल, 4:तलातल, 5: महातल, 6: रसातल,
7: पाताळ या सप्त पाताळ स्थित वास्तु भुमी खाली दोष
आहेत ते दोष परिहार करण्यासाठी व या भुमी वर जेव्हा आपण वास्तु निर्माण करतो तेव्हा लोखंड कुठून येते, विटा कुठून येतात, रेती नदीतुन येते(नदी अनेक मृतां जनांचा अस्थि विसर्जन केलेले असते) या द्वारे ह्या वस्तू आपल्या वास्तु निर्माण करण्यात साह्य करतात व वास्तु निर्माण करतात अनेक सुक्ष्म जीव मारले जातात या सर्वाचे दोष वास्तुच्या मालकाला लागतात.
या सोबत हे सर्व दोष वास्तुही (घराला) लागतात हे दोष परिहार जाण्यासाठी वास्तुशांती पुजन करतात
©Mahajan guruji
की प्रत्यक्ष वास्तुशांती पुजा कशी केली जाते आणि त्यासाठीचे विधान काय आहे कुठल्या गोष्टींचे पथ्य पूजना पूर्वी पाळायचे असते।
लेख क्रमांक एक मध्ये आपण वास्तू शब्दाचा अर्थ....?वास्तुपुरुषाची उत्पत्ती...? वास्तुशांती करण्याचे फायदे...? तसेच वास्तुशांती न केल्यास होणारे परिणाम ....?
यांची माहिती समजून घेतली.
महाजन गुरुजी या फेसबुक पेजवर आपण वास्तुशांती विधान या मालिकेतील तीन लेखांपैकी पहिला लेख नक्कीच वाचला असेल.
आता दुसऱ्या लेखांमध्ये आपण प्रत्यक्ष वास्तुशांती पुजा कशी करावी हे पाहणार आहोत.
कोणीही नविन घर, फ्लैट, रोहाऊस, दुकान किवा आपल्या मालकी नविन अथवा जुनी वास्तु घेतल्यास वास्तु शांति करवी एकदा वास्तु शांती केल्यावर हा श्रीवास्तु देव आपले रक्षण करतो
पण त्याप्रमाणे आपण आर्थिक जुळवाजुळव करुन मनापासून ती तयार करतो. मात्र निवास करण्यापूर्वी वास्तुशांती नावाचा विधी करण्यास विसरतो किंवा सोयीस्कररित्या टाळतो. त्यासाठी अनेक कारणे आपल्याकडे असतात.
एक ना अनेक कारणं आपल्याकडे असतात. जी वास्तू तयार करताना रंगरंगोटी, इंटेरियर, फर्निचर यासाठी आपण जितकी काळजी घेतो, जेवढे सजग आपण असतो, तितकेच आपण वास्तुषांती विधी करण्याबाबत निरिच्छ व उदासीन असतो.
मग वास्तुशांती केव्हा व कशी करावी? यातील मुख्य विधी कोणते?
Khupch chhan mahiti dili guruji khup mohatvachi v garjechi aahe thnak you
सर तुम्ही विस्तारित रुपात समाधान केले खरंच खूप छान सांगितले तुम्ही🙏🏻 आम्ही फ्लॅट घेतला sir आताच खरेदी झाली reselling आहे तर वास्तू करावे की नाही.... अमरावती वरून भारती भांगे
आपण फ्लॅट खरेदी केल्यानंतर जरी तो रिसेलचा असला तरीही वास्तुशांती जरूर करावी...
खूप छान माहिती सांगितली सर धन्यवाद
Khupach chan mahiti guruji,tumhi aamchya ghari punyala yevun vastushanti pooja kelit , khup khup Dhanyavad.pooja khupach mast zali.
धन्यवाद रश्मी ताई
Dakshina kiti aste
Nice information Guru ji
धन्यवाद गुरुजी 🙏
खुप छान माहिती धन्यवाद 🙏
छान माहिती
खूपच छान माहिती दिली
अगदी मनासारखी माहिती दिली
Khup sundar mahiti dilit guruji 🙏
हरिओम्
खूपच छान व उचित माहिती
खूप खूप धन्यवाद
Hari om Àmbadnya Guruji Nathsanvidh
Guruji🙏
Navin vaastu madhe kiti velet(varsh) keli tar chalte?
Plzz rpy
नवीन घर खरेदी केल्यानंतर लवकरात लवकर वास्तुशांती करून घ्यावी
घरात छोट्या छोट्या गोष्टी मुळे वाद भांडणं होतात
काय करावं
Hari Om kupach chan
गुरुजी नमस्कार वास्तू शांती प्रयोग अपलोड करा हात जोडून विनंती कारण नवीन पुरोहिताला आपल्यासारख्या सर्वज्ञ गुरुजींच्या मार्गदर्शनाची आणि काळाची गरज आहे वास्तू शांती विधी जरूर अपलोड कराल अशी आशा करतो गुरुजींना कोटी कोटी अंतःकरण पूर्वक नमस्कार
जरून एक व्हिडिओ याबद्दल ही नक्कीच बनवेल आपण गृहप्रवेश संदर्भातील व्हिडिओ जरूर पाहावा त्याचाही आपणास योग्य उपयोग होईल
🙏 नमस्कार गुरुजी माझा प्रश्न आहे लग्नात व वास्तुशांती ला जे घराला बेगडी तोरण बांधतात ते तोरण घराला किती दिवस ठेवायचं असतं नी काढून त्याचे विसर्जन कसं करावं व कुठं हेही सांगा?🙏🙏
नमस्ते गुरुजी मी जुन घराचं चौकटी फरशी ओठा सर्व बदलुन नवीन फर्निचर वैगेरे बनवलं आहे तर पहिली लोकांनी वास्तुशांती केली असेल तर आता आणि दुसरी वास्तुशांती करावी का????
वास्तुशांती किंवा उदक शांती पूजा करून घ्यावी
Maze dirache nidhan zale tar amhi gruh prav esh Kiva vastushanti kiti divasani Karu shakato
16 दिवस नंतर करावी.... काहीही हरकत नाही
खुप सुंदर सांगितल गुरुजी..सर्व शंका दूर झाल्या..
Namskar Guruji, chaan mariti sangitali. Maze Gavi navin ghar tayar hot ahe. Pan thethe 1te 2 mahinyatun 2 divas Janar, tar vastu Shanti karavi ki Anya kahi pooja
वास्तु पूजेसाठी वास्तुपुरुषाची सोन्याची प्रतिमा पाहिजे का मग ते गरिबांनी कसं करावं उत्तर द्या
यात गरीब श्रीमंत असा कोणताही भेद नाही सोन्याची प्रतिमा जमिनीत ठेवली तर शंभर वर्षानंतर सुद्धा सोने तसेच राहते पंचधातू चांदी लोखंड हे मातीमध्ये नष्ट होऊन जाते त्यामुळे वास्तुशांतीचा मूळ उद्देश सफल होत नाही कितीही गरीब असला तरी जो घर बनवतो तो घरासाठी वास्तुपुरुष ठेवू शकत नाही का....???
म्हणजे सर्व पैसे मंदिर बनवण्यात खर्च झाले आणि मूर्ती आणायला पैसे उरले नाहीत असं झालं तर देवालय कसे पूर्ण होणार
गुरूजी वास्तु शांती आणि सत्यनारायण पुजा एकत्र केली तर चालते का
छान माहितीपूर्ण विडीओ गुरुजी जर घरामध्ये काही नवीन कामं केले तर पुन्हा वास्तुशांती करावी का
वास्तुशांती एकदाच होत असते। मात्र आपण उदक शांती जरूर करू शकता
@@Mahajan.guruji धन्यवाद गुरूजी
नमस्कार गुरुजी मुहूर्त आहे पण थांबायला वेळ नाही अश्या वेळी मार्गशीर्ष महिन्यात चांगला दिवस पाहून वास्तू शांती पूजा करता येते का
हो
मंगळ गुरू आहे तर पूजा केलेली चालेल का?
जरूर करून घ्यावी
गुरूजी वास्तुशांती केल्यानंतर ४०दिवस मांसाहार करू नये असे शास्त्र आहे का
शक्यतो टाळावा उत्तम राहील
वास्तुशांती किती वेळा करावी
वास्तुशांती करण्यासाठी महत्वाचे लग्नकुंडली असते का
नाही
गुरूजी वायव्य दिशेला किचन हे योग्य आहे का आणि जर असेल तर ते चांगले किंवा वाईट हे सांगा
किचन ची मुख्य दिशा आग्नेय आहे।पर्यायी दिशा पश्चिम आहे।
वायव्य दिशेला किचन असेल तर अपचन चे त्रास घरातील मंडळी ना होत असतात।
4थ्या मजल्यावर फ्लॅट आहे. वास्तुशांति करावी की उदकशांति करावी?
वास्तु शांती च करावी
@@Mahajan.guruji धन्यवाद गुरुजी नमस्कार स्वीकार करावा.
नमस्कार गुरूजी 🙏 माझा एक प्रशण आहे. जे परदेशात राहतात त्यांना वास्तू शांती करणे शक्य नाहीये त्यांनी काय करावे?
घरात गंगाजल शिंपडावे.
माझा पण हाच प्रश्न आहे. 🙏
माझ्या भाच्या ने तिथे दत्त याग केला होता 🙏🌹
नवीन ब्लॉक घेतल्या नंतर गृहप्रवेश कीव्हा वास्तुशांती कशी करावी तुमचं मार्गदर्शन घ्यायचं असल्यास काय करावे
माझ्या मोबाईल वर आपण कॉल करू शकता
गुरूजी नमस्कार उदकशांती किती वर्षानी परत करणे आवश्यक आहे.
उदक शांती दर 5 वर्षाने करावी। वास्तू ऊर्जा अखंड राहते।
गुरुजी ३०वर्षे पुर्वी घरबांधुण रहात आहे घरभरणी केली नाही .अडचणी व शत्रु भरपूर सर्व च लिहता येत नाही मी घरात काय वाचावे दोष जाण्यासाठी मी वाचन स्त्रोत्र मंत्र कोणते करावे .
संध्याकाळी छान साधू करून तीन वेळा रामरक्षा पठण करावे नित्यनियम
बघते प्रयत्न करुन व्हिडीओ बघून वाचते संस्कृत येत नाही
नवीन वास्तूत रहायला गेल्यावर 10ते 12 दिवसांनी वास्तुशांती केली तर चालेल का?
वास्तुपूजेला पुरणपोळी चा नैवेद्य दाखवतात का.. प्लीज सांगा
लवकरच वास्तुशांती विधी करून घ्यावा। खरे तर निवासस्थानी निवास करण्यापूर्वी च वास्तुशांती करणे केव्हाही उचित।
@@Mahajan.guruji धन्यवाद गुरूजी 🙏
वास्तुशास्त्र भरपूर आहे पण नाईलाज आहे .काय करावे
प्रत्येक दोषा वरती उपाय आहेत
Namaskar guruji
आम्ही मुंबईला राहतो पण गावी नवं घर घेतलं आहे तर आम्ही त्या नवीन घरात लक्ष्मीपूजन केले तर चालेल का? आम्ही सुट्टीला नेहमीच जातो तिकडे ५ वर्ष झाली घर घेऊन
हो चालेल
गुरुजी तुम्ही अमरावती मध्ये येऊन वास्तू शांती करून देऊ शकता का
हो नक्कीच। आपण बडोदा इंदोर भोपाळ केरळ हरियाणा येथे ही पूजन केले आहे।
नमस्कार गुरूजी आम्ही ३२ वर्षांपूर्वी वास्तु शांती केली आहे..तर पुन्हा कराणयाची गरज नाही ना..
15 वर्षे नंतर जरूर वास्तू शांती करावी
नवीन घराची वास्तू शांती केली, आणि नंतर तिथे फर्निचर साठी 2 महिने सुतार ने राहून काम केले (म्हणजे कुटुंब नंतर राहिले) तर काही प्रोबलेम नाही ना?
पूजेच्या रात्री राहावे। नंतर कधीही कोणीही राहिले तरी हरकत नाही
June Ghar p adun navin bandhane sathi kahi niyam ahet ka?
नवीन निर्माण करण्याच्या पूर्वी सर्वप्रथम उदक शांती विधी करून घ्यावा आणि संपूर्ण घर तयार झाल्यानंतर पुन्हा एकदा वास्तुशांती करावी
Navin ky kam kele tr punha navin kravi ka vastushanti
थोडे फेरफार असतील तर आवश्यकता नाही। मात्र जर मेजर चेंज जसे लादी बदल भिंत तोडणे सिलिंग वर्क असे केले असेल तर मात्र उदक शांती हा विधी करून घ्यावा।
घर घेतल्यापासून किती दिवसात वास्तूदोष आहे हे कळते किंवा अनुभव येतो
प्रगती आणि अधोगती वरून कळते। पण 6 महिने खूप होतात समजायला।
व्यवसायासाठी घेतलेली जागा जर छोटी असेल तर वास्तुशांती कशी करावी?
स्वतःच्या मालकीची असेल तर वास्तुशांती जरूर करून घ्यावी भाडेतत्त्वावर असेल तर गणेश पूजन करावे...
@@Mahajan.guruji धन्यवाद गुरूजी , मोकळी जागा ही ८*१०फूट मिळते, तर त्यात होम होईल का की जागा अपूरी पडेल? अशा परिस्थितीत कृपया काही उपाय सुचवाल का?
@@rem8475 हवन करता येईल
@@Mahajan.guruji आपल्या अमूल्य मार्गदर्शनाबद्दल धन्यवाद गुरुजी.🙏
काही कारणाने वासुशांत करायची राहीली असेल तर ती आपण किती वर्षापर्यंत करू शकतो. ?
लवकरच करावी। घराला वास्तू पुरुषांच्या अधीन ठेवणे केव्हाही उत्तम।
व्यवसाया साठी घेतलेली जागा छोटी असेल तर
आम्ही वासुशांत केली नाही,फक्त कलशपूजन केले आहे आता 15 वर्ष झाली आता काय करावे. ?
वास्तुशांती जरूर करावी।
Guruji gharat yeun 4 years suru aahe aata vastu shanti keli tr chalel ka
जरूर करावी
मार्च महिन्याचे राशिभविष्य सांगितलं नाही तुम्ही
कार्य व्यसत्ते मूळे शक्य नाही झाले। कारण या सर्व गोष्टी सोबत मी पौरोहित्य ही करतो
नमस्कार गुरुजी🙏आम्ही वास्तुशांती केलेली नाही. फक्त कलश पूजन केले आहे.घरात येऊन आम्हाला 5 वर्ष पुर्ण झाले आहे. आता काय करावे?
वास्तुशांती जरूर करावी
आमचं पहिलं घर होते तिथेच आम्ही पुन्हा नव्याने घर बांधले आहे परंतु पहिलं पण वास्तुशांती केली नाही आता करायची खुप इच्छा आहे परंतु काही ना काही क
कारणानें योग्य येतं नाही काही तरी उपाय सांगा म्हणजे लवकर योग येईल ते सांगा
नक्कीच
आपण मला व्हाट्सएपच्या माध्यमातून संपर्क करा
@@Mahajan.guruji नंबर पाठवा ना
@@shobhachandak6374 माझा नंबर आहे व्हिडीओ मध्ये
@@Mahajan.guruji Bharat renovation ke Jila Sant Kabir Nagar ka
एकादशीला वास्तुशांती केली तर चालते का
वास्तु चा मुहूर्त असेल तर नक्की करू शकता
प्रेग्नेंट स्त्री (7 महिने) ने वास्तू शांत ,सत्यनारायणाची पूजा आणी गृह प्रवेश केला तरी चालेल का
7 महीने पर्यन्त चालते पूजन केलेले
धन्यवाद गुरुजी 🙏
वास्तूशांती साठी साधारण किती खर्च येतो?
मला आपण जर व्हिडीओ मधील व्हाट्सएपच्या नंबर वर मेसेज केला तर उत्तम होईल
Namsakar guruji... Amhi rent vr rahato 2 year zale pn ethe alyavasun khup adhogati chalu ahe kamat khup problem yetat tr amhi vastu shanti kshi kravi rent ne rahato tr tumhi krupya upay sanga guruji
रेंट च्या घराची वास्तुशांती आपण करू शकत नाही।
Sir dusara kahi upay ahe ka yavr
@@swapnilnaik6052 दररोज सायंकाळी धूप करावा घरात। आणि सायंकाळी शुद्ध तुपाचा दिवा लावावा
Navin gharat home karayla kiti kharch yeto
व्हाट्सएपच्या नंबर वर संपर्क साधावा
सेकंड हॅण्ड फ्लॅट घेतलेवर वास्तुशांती करणे आवश्यक आहे का?
वास्तुशांती झाली नसेल तर जरूर करावी। झाली असल्यास केवळ उदक शांती करावी।
वास्तू देवतेचे विसर्जन कसे करावे?
वास्तू देवतेचे विसर्जन न करता - निक्षेप केला जातो। घ्राच्ये आग्नेय कोण मध्ये वास्तू प्रतिमा ठेवली जाते
@@Mahajan.guruji पण ती वास्तू आम्हीं विकली असेल आणी दुसऱ्या मालकाला वास्तू शांती करायाची असेल तर पहिल्या वास्तू देवतेचे काय करावे?निक्षेप म्हणजे काय?
@@prashantvast7443 निक्षेप म्हणजे वास्तू प्रतिमा जमिनीत ठेवणे। आपण घर विकले असेल आणि दुसऱ्या मालकाला परत वास्तू करायची आवश्यकता नाही। मात्र जर वास्तुशांती करायची असेल पुन्हा नवा वास्तू निक्षेप करण्याची गरज नाही
@@prashantvast7443 वास्तुशांती दर 15 वर्षाने ही करू शकता
Juna flat ghetla asel tr vastu shanti karavi ka aadhi keli ki nahi mahit nahi…aamhi Ganesh pujan aani kalash pujan kele aahe
वास्तू शांती जरूर करावी
@@Mahajan.guruji 🙏🏻
वास्तू शांती नाही केली आणि गणेश पूजन केले तर चालते का
गणेश पूजन केव्हाही करू शकता। मात्र गृहप्रवेश झाल्यावर 6 महिन्याच्या आत वास्तुशांती जरूर करावी। - @महाजन गुरूजी
वास्तूशांत करण्यास किती खर्च येतो.
Vastu shanti kiti vala karayachi?
1 वेळ
आम्ही घर विकत घेतले पाहिले ज्यांच घर होत त्यांनी वास्तू शांती केली आहे. मग आम्हाला पुन्हा करावी लागेल का
आवश्यकता नाही। आपण उदक शांती विधी करावा
वरील बाबींची माहिती द्यावी
.
धन्यवाद गुरुजी